सोमवार, ३ जानेवारी, २०११

वाघाचे पंजे---५
"धूम-२.....टू इटाली..."
इंदिरा गांधींच्या हातून जेव्हा सत्ता गेली तेव्हा सोनिया गांधी मुलाबाळासकट व राजीव गांधीसोबत दिल्लीतल्या इटालियन दूतावासात आश्रयाला गेल्या होत्या. एवढेच नव्हे तर ते सगळे तिथे तीन चार दिवस मुक्कामाला होते. उघडच त्यांना इटालीला जाणे ज्यास्त सुरक्षित वाटले असेल तेव्हा. म्हणतात की तेव्हा राजीव गांधी ह्यासाठी तयार नव्हते पण त्यांचा पहिल्यांदा तरी नाईलाज झाला होता.
आता ह्या बोफोर्सच्या लाचेवर टॅक्स आकारण्याच्या निकालाने त्यांच्यावर परत अशी पाळी येईल का ? त्या परत केव्हा पळून जाण्याचा विचार करतील ?
ह्या निकालाने लाच दिल्या गेली होती हे कळाले तरी ती कोणाला दिली गेली होती त्यात त्यांचे नाव येत नाही. किंवा राजीव गांधींचेही नाव येत नाही. त्यामुळे कायद्याने उद्याच अटक होईल अशी काही परिस्थिती नाही. पण हळू हळू पकड ढीली पडतेय हे मात्र दिसते आहे.
आंध्रातला जगन खरे तर एवढासा पोर. पण त्यानेही विरुद्ध जाऊन काहूर पेटविले. पोस्टर्स जाळली, निषेध केला. म्हणजे आंध्रातली सत्ता गेल्यातच जमा आहे. आता ती सांभाळायची म्हणजे बराच पैसा ओतावा लागणार. त्यापेक्षा तो खर्चच न करता परस्पर....
तरी बरे की राजा व राडिया ला अजून पकडलेले नाही. त्यांनी जर सुब्रह्मण्यम स्वामी सारखे सांगायला सुरुवात केली तर मोठी पंचाईत यायची. पाठींबा काढू नये म्हणून करुणाच भाकावी लागेल. त्यासाठी त्यांना शक्य तो मोकळेच ठेवावे लागेल. कलमाडींनीही चुपच बसावे तर त्यांनाही वेळ द्यावा लागेल. म्हणजे एकूण अजून खूप वेळ काढायचा आहे. नंतर अंगलट आले तर बघू.....
पहिल्याच जेपीसीचे भूत बोफोर्समधून प्रकट होतेय, तर दुसरी जेपीसी मंजूर केली तर निकालच लागला म्हणायचा. बरे इमानदारीने कोणावर भिस्त ठेवावी अशी माणसेही आजकाल भोवती नाहीत. प्रणबदांना मधनं मधनं राजीवजींच्या वेळेस मिळालेला प्रसाद आठवतो की काय कोण जाणे, कारण तेही आजकाल थोडे आशाळभूत झाल्यासारखे दिसताहेत. बिहार गेले, अजून काय काय जातेय कोण जाणे....तोपर्यंत थांबावे की ?.....बेनजीर, मुशर्रफ सारखी आधीच व्यवस्था करून ठेवावी ? धूम-२.....टू इटाली....करावे ?