मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

-------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे----१९
भिकार्‍यांचा राजा---बेगर किंग
जंगलात अचानक वाघाचे पंजे दिसावे व वाघ जवळच असावा, हे जसे ठशांवरून कळते तसे काही वेळा कोण काय बोलते त्यावरून खरा अंदाज निघतो !
राहूलने महाराष्ट्रात फिरताना एके ठिकाणी गाडीच्या काचा खाली करून रस्त्यावरच्या भिकार्‍याला विचारले की तू कुठून आला आहेस ? तर त्याने सांगितले की यूपी मधून. म्हणजे तुम्ही युपीमधले लोक महाराष्ट्रात भीक मागायला जाता, हे खरेच आहे. ती वस्तुस्थिती आहेच. उगाच राहूलच्या नावाने आरडाओरड का करता ?
असेच त्याने दिल्लीत एका सिग्नलला गाडी उभी असताना शेजारच्या मर्सीडीज वाल्याला विचारले होते की तुम्ही कुठून आलात ? तर त्याने सांगितले की इटलीतून. म्हणजे इटालियन लोक भारतात येऊन श्रीमंत होतात, हे ही तितकेच खरे असावे !
लोकसभेत सोनिया गांधी, कृषिमंत्री शरद पवारांच्या डावीकडे बसतात. तसेच त्यांच्या डावीकडे वित्तमंत्री प्रणब मुखर्जी बसतात. एकदा शरद पवारांना विचारण्यात आले की नेमक्या डावीकडेच तुमच्या तोंडात कॅंसर कसा झाला ? तर त्यांनी डावीकडे पाहिले. तर त्यांना दिसल्या सोनियाजी. प्रणब मुखर्जींना विचारण्यात आले की तुमची अर्थव्यवस्था इतकी उजवी आहे, ठणठणीत आहे, तर आताच तिला कॅंसरसारखी घरघर का लागली ? तर त्यांनी उजवीकडे पाहिले. तर त्यांना दिसल्या सोनियाजी. ह्यावरून राहूलला कळले की कॅंसरमध्ये डावे-उजवे असत नाही !
इटली मध्ये खूप वर्षांपूर्वी एका समाजात अशी पद्धत होती की मेलेल्या व्यक्तीला ज्या शवपेटीत ठेवीत त्याच्या भोवती त्या व्यक्तीच्या आवडत्या खाण्याच्या वस्तू ठेवीत. तिथेच दुसर्‍या एका समाजात अशी पद्धत होती की मेलेल्या व्यक्तीला ज्या शवपेटीत ठेवीत त्याच्या भोवती एक खतरनाक विषारी साप ठेवीत. एका पर्यटकाने गाईडला विचारले की अशा वेगवेगळ्या पद्धती का होत्या ? गाईड सांगू लागला की त्यावेळी एक माणूस मरण पावला होता. रीतसर त्याला शवपेटीत ठेवण्यात आले होते. पण त्याच्या नातेवाईकांनी अर्ज केला की सकाळीच तर ते चांगले हसतखेळत होते. ते मेलेले नसतीलच. राजाच्या आदेशावरून थडगे उकरण्यात आले, शवपेटी उघडण्यात आली, तर काय खरेच तो माणूस जिवंत होता. ह्यावरून राहूल राजाने फतवा काढला की ज्या माणसाला पुराल, तो मेलेलाच असला पाहिजे. एका समाजाने ह्यावर विचार केला की समजा तो जिवंत असेल तर त्याला आसपास काही खाण्यासाठी ठेवावे, म्हणजे तो जगेल तरी. दुसर्‍या समाजाने विचार केला की उगाच आपल्यावर शेकायला नको. शवपेटीत एक विषारी साप ठेवू या. माणूस जिवंत असेल तर साप त्याला चावेल व राजाची आज्ञा पाळल्या जाईल. तर, ह्या गोष्टी बरहुकूम राहूलने ६ हजार कोटी रुपये युपीच्या विणकरांना कर्जाऊ आणले आहेत. आता ते इतरांकडून भीक मागणार नाहीत. भीक मागायला महाराष्ट्रात जाणार नाहीत. ह्यावर मायावती म्हणतात, आता आमच्या लोकांना महाराष्ट्रात भीक मागायला जावेच लागणार नाही. त्यांच्या सोयीसाठी आम्ही युपीचेच चार भाग करतो आहोत. त्यांना आता जवळच भीक मागता येईल !

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

----------------------------------------------
Rahul ----The Beggar King !
Don't you doubt that UPwallas are beggars. As Rahul says, once he asked a beggar in Maharashtra, "Where are you from ?" and he said UP. That proved that people from UP go to Maharashtra to beg. ( Period ! )
Similarly once Rahul asked the man in the neighbouring Mercedeze car, "Where are you from ?" And he answered, "From Italy". Doesn't this prove that people from Italy become rich, once they come to India ?
Since both times he is right, let us concede to Rahul that he wins, hands down ! ( Symbol "hand" not down ! )
Similar is the inference from our Parliament. If you have observed, Soniaji sits next to Agriculture Minister, Shri.Sharad Pawar. Pawar sits left to her, and Finance Minister PranabMukherjee sits to her right. Once Pawar was asked, why did you have cancer in your left cheek ? Before answering he looked left and there was Soniaji. When Finance Minister had said that Indian economy is healthy, he was asked, how come, it has become so sick, so quickly ? Before answering he looked to right and there was Soniaji. When this was narrated to Rahul, he rightly concluded that one should ne agressive and give cancer to right , left and center !!!
Tourists going to Italy tell this story. This ,story highlights, how you should give an order . The story goes like this: In Italy there is a custom in one class of society to bury a dead man in a coffin and keep eatables in the coffin. There is another class in the Italian society which similarly burries people in the coffin but they keep a deadly pisonous snake in the coffin. The Tourist asks the guide, as to why such different customs ? The guide explains that it is because the right question was not asked by the King. How so ? Guide narrates that once a man died and was burried in the coffin, as per custom prevailing then. The dead man's relatives appealed to the King that it must be a mistake. The said man was very much alive in the morning and could be still living and not dead. King ordered to reopen the coffin and to everybody's surprise the dead man was really alive, though very weak. The king Rahul then ordered that henceforth, only dead persons should be burried. One class of society thought that by mistake, if the person is alive then let us keep some eatables in the coffin so that he may survive. The other class of society ( Rahul's party perhaps ) thought that to make sure the man is really dead , let us keep a poisonous snake in the coffin, so that when re-opened he would definitely be dead. Taking cue from the story, Rahul has brought a Cenral Govt; scheme of six thousand crores rupees, by which he will give loans to the weavers in UP. Now, he is sure the UPwallas will not have to go to Maharashtra for begging. Similarly for the same cause, Mayawati has proposed splitting UP in four smaller states, so that UPwallas don't have to go all the way to Maharashtra for begging. Now they can beg, near, in UP itself ! One order and two ways of customs !!

------------------------------------------------------
Arun Anant Bhalerao

-------------------------------------------------------------------------------------------------

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे----१८

मधुमेह अधिक बालदिन

लग्नसंमारंभाच्या वेळेस जेव्हा लगबग असते व गाड्या व माणसे यांची योजना करतात तेव्हा हमखास लहान पोरांना काय, कुठल्याही गाडीत कोंबतात. पूर्वी जसे म्हणत गाड्याबरोबर नळाची यात्रा. ( बैल गाड्यांच्या ऍक्सल वर चाक फिरायचे त्याला वंगण, एक प्रकारचे ऑइल, लावण्यासाठी ते एका नळकांड्यात ठेवून ते गाडीला अडकवीत व अशी नळाला गाडीबरोबर यात्रा घडे ! ). असेच ह्यावर्षीच्या बालदिनाचे झाले असावे. पूर्वी कसा बालदिन एकटा स्वतंत्र येई. मग त्याचे लाडही स्वतंत्र व खास होत असत. पण ह्या वर्षी मधुमेह-दिन व बालदिन एकत्रच आले आहेत. हे म्हणजे कोणी तरी लहान मूल समजून बालदिनाला मधुमेह-दिनाबरोबर ढकलले असावे. बालदिन काय तर फुगे, फुले, चॉकलेट, वगैरे. ते आता मधुमेह-दिनाबरोबर करूयात की !
चाचा नेहरूंचा हा खरे तर वाढदिवस. १४ नोव्हेंबर. पण त्यांना मुले आवडत म्हणून बालदिन करायची प्रथा सुरू झाली. चाचा नेहरूंना मुले खरेच आवडत हे मात्र नक्की. कारण मी तिसरीत असताना हे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यावेळी मी हैद्राबादी होतो. माझी आई आजारी होती. तिला डॉ.मेलकोटे ह्यांच्या सॅनेटोरियम मध्ये ठेवलेले होते. हे डॉ.मेलकोटे हैद्राबादचे आरोग्यमंत्री होते व नेहरूंसारखेच लाल-बुंद गोरे होते. त्यांच्या सॅनेटोरियमला चाचा नेहरू भेट देणार होते. हे मला हॉस्पिटलच्या नर्सेस, दायांकडून कळले आणि मी लागलीच तिथल्याच एका गुलाबाच्या झाडावरचे टपोरे गुलाबाचे फूल तोडले व सगळेजण जिथे नेहरूंची वाट पहात होते तिथे उभा राहिलो. नेहरू आले व एकच लगबग झाली. मोठी माणसे अंदाजाने लगेच पुढे झाली. मी दिसेनासाच झालो होतो. मला वाटले आता कसले दिसतात आपल्याला चाचा नेहरू व आपण त्यांना कसे देणार गुलाबाचे फूल ? पण ह्या गर्दीला मध्येच चिरीत चाचा नेहरूच माझ्याजवळ आले, थोडे वाकले व मला फूल द्यायचे सुचायच्या आत स्वत:च त्यांनी ते फूल स्वीकारले. एका क्षणाचाच प्रसंग. पण आज साठ वर्षे तो माझ्या स्मरणात लख्ख स्पष्ट दिसतो. त्या माणसाचे लहान मुलांचे प्रेम खरेच मोठे प्रांजळ व निर्मळ होते.
असल्या चाचा नेहरूंचा वाढदिवस मधुमेह-दिनाच्या दिवशी यावा ह्यात काही तरी अनामिक संकेत असावा. मधुमेह म्हणतात की अनुवंशिक असतो. आपल्या आईवडिलांपैकी कोणाला तो असला तर आपल्यालाही तो होऊ शकतो. माझ्या आईला मधुमेह होता. म्हणून की काय दोन वर्षांपूर्वी मलाही तो झाला. मधुमेहात आपण जे अन्न खातो त्यातली उर्जा घेण्यात येताना ज्या साखरेचे उर्जेत रूपांतर व्हायला हवे ते पूर्ण प्रमाणात न होता ज्यास्तीची साखर आपल्या शरीरात, रक्तात तशीच साठून राहते. मग त्याचा दुष्परिणाम होतो. तर अशा मधुमेहाचे व चाचा नेहरूंचे काय संबंध असावेत ?
भारताच्या जनतेने जवाहरलाल नेहरूंवर अतोनात प्रेम केले. त्यांना जवळ जवळ सगळे खूनच माफ केल्यासारखे, जनता त्यांच्यावर प्रेम करी. इतके की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला विरोध केला तरी जनतेने त्यांना अपशब्द कधी दिले नाही. निदर्शने जरूर केली. त्यांना महाराष्ट्राचे वेगळे राज्य निर्माण करण्यास भाग पाडले पण त्यांचा दुस्वास नाही केला. असेच त्यांच्या राजनीतीचेही लोकांनी कौतुकच केले. हे कौतुक, लाड इतके झाले की जनतेलाच ह्या गोडपणाने जणु मधुमेहाचा त्रास व्हायला लागला. आजही नेहरूंच्या कित्येक गोष्टी जनतेला सतावीत असतात. पण मधुमेह देणार्‍या आईवडिलांना जसे आपण दूषण देत नाही तसेच नेहरूंना कोणी फारसे वावगे बोलत नाहीत व त्यांच्यावर आजच्या मधुमेहाचे खापर आपण फोडत नाही.
जंगलात जसा सगळीकडे हल्लकल्लोळ असला तरी श्वापदांच्या ठशांवरून लोकांना त्यांना ओळखावे लागते, त्यांचा सुगावा काढावा लागतो त्याच प्रमाणे राजकारणातल्या असंख्य मतभेदात काही अनामिक ठशांवरून आपापले अर्थ काढावे लागतात. जसे राजकारणातल्या अनेक वादावादीत नेहरूंचे स्मरण त्यांच्या लहान मुलांच्या निर्वाज प्रेमामुळे आजही आपल्याला सुखकारक वाटते.त्यांच्या असंख्य घोडचुकींमुळे देशाला झालेला मधुमेह त्यांच्या मुलांवरच्या प्रेमापोटी आपण सुसह्य समजतो.
म्हणजे ? म्हणजे ?.....वाघाचे पंजे ?

------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------------------