रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

अण्णांच्या मौनाची भाषांतरे:
जंगलातले ठसे जसे श्वापदांची माहीती देतात, तसेच कधी कधी जंगलातली नीरव शांतताही खूपसे ऐकवून जाते. जसे अण्णांचे मौन खूप सांगून जाते. जसे:
परममित्र दिग्विजय :अण्णांचे मौन ही नक्कीच आरएसएस ची चाल आहे. एक दिवस अशा योजनेने आरएसएस संपूर्ण देशालाच चुप बसवेल.
(अण्णाजी का मौन, यह जरूर आरएसएस की चाल है । आरएसएस ऐसा ही पूरे देश को एक दिन चुप करायेगा ।)
मनमोहनसिंग : अण्णांचे मौन हे काही अवघड प्रकरण नाहीय. मी तर हे नेहमीच करत आलो आहे. राहूल काहीही सांगो, मी तर चुपच बसतो. ए.राजा, कलमाडी, मरन वगैरे मंत्री काहीही म्हणोत मी चुपच बसतो. त्यांनी माझ्यासमोर सर्व कर्तबगारी दाखविली पण मी काही बोललो का ?
(अण्णाजी का मौन इतनी क्या बडी बात है ? मै तो ये हरघडी रखता आरहा हूं । राहूल कुछ भी बोले, मै तो चुप ही रहता हूं । राजा, कलमाडी मेरे सामने सब कर्तब दिखा रहे थे, लेकिन मै कुछ बोला ?)
सोनिया : मला अजून हिंदी, इंग्रजी वगैरे भारतीय भाषा नीट अवगत नाहीत. म्हणून मग मी बघा कशी गपच बसते, सर्ववेळ !
(आय हॅव्ह स्टिल नॉट गॉट द हॅंग ऑफ हिंदी ऑर इंग्लिश, सो सी आय कीप क्वाएट ऑल द टाईम ।)
राहूल : अण्णांच्या मौनाला आम्ही फक्त उचलूनच नाही तर त्याला एक घटनात्मक दर्जा देऊ. पाहिजे तर घटनेत बदल करून आम्ही सर्वांना मौन धरायला लाऊ.
(अण्णाजी के मौन को हम घटनात्मक दर्जा देंगे । घटना मे बदल करके सभी को हम चुप करायेंगे ।)
लालकृष्ण अडवाणी : अण्णांचा हा मौनाचा मार्ग जर जनतेला भावत असेल तर माझी सातवी रथ-यात्रा ही मौन-रथ-यात्रा असेल. ती खूप काही सांगेल.
(जनचेतना रथ-यात्रा समाप्त होते ही हम अण्णाजीके बताये हुये रास्तेसे मौन-रथ-यात्रा निकालेंगे । वह बहुत कुछ कहेगी ।)
अरुण जेटली : मौन राखणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. चोरांना पकडल्यावर पोलीस कायदेशीर भाषेत सांगतातच की तुम्हाला काहीही न बोलण्याचा अधिकार आहे. तर मौन हे असे कायदेशीर आहे.
(मौन रखना यह एक कानूनी प्रक्रिया है । अंग्रेजी मे पोलीस चोर को पकडने के बाद कहते है की यू हॅव्ह राईट टु रिमेन सायलेंट । मौन ऐसा कानूनी है ।)
सुषमा स्वराज : मला ह्यात सरकारचे कारस्थान दिसते आहे. सरकार अशाप्रमाणे एक आवाज बंद करीत आहे.
(मुझे इसमे सरकारका षडयंत्र दिखता है । सरकार एक एक का ऐसा आवाज चुप करा रही है ।)
कपिल सिबल : मला टीम अण्णा म्हणते की मी नेहमी गोष्टींना वळणे देत राहतो. एकाच दिवशी १७ मुलाखतींचा विक्रम तर अण्णाच करतात. एका मुलाखतीत अण्णा म्हणाले होते की लोकपालाने भ्रष्टाचार नाही थांबला तर मी कपिल सिबल ह्यांच्या घरी पाणी भरीन. आता मी सिंटॅक्सच्या मोठ्या टाक्याच आणून ठेवतो. कदाचित ते त्या भरायला येतीलही.
(यह मुझे बताते थे के मै बात हमेशा घुमाता हूं । अब देखीये, अण्णा एक दिन मे १७ इंटरव्ह्यू देते थे और अब मौन रख रहे है । ऐसे बात फिराते फिराते वे तो चुपही हो गये है । अब मै सिंटॅक्सकी बडी टांकिया ले रहा हूं । शायद जल्दही अण्णा मेर घर पानी भरने आयेंगे, जैसा उन्होने कहा था, मौन के पहिले ।)
सलमान खुर्शीद : आम्ही आधी आमच्या सर्व नेत्यांचे मत घेऊ व मगच अण्णांच्या मौनावर बोलू.
(हम इस पर सबही नेताओंकी राय लेंगे और फिर अण्णाके मौन पर बोलेंगे ।)
बाळासाहेब ठाकरे : अरे गप काय बसताय. मनातल्या शिव्या कोणाला ऐकू येत नाहीत, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणून तर आम्ही अजूनही बोंबलोतय ना ?
( मौन क्या रखते हो ? मनमे दी हुई गालियां किसी को सुनाई नही देती यह मैने खुद जाना है ।)
अरविंद केजरीवाल : अण्णांच्या मौनाचा निर्णय आम्ही असाच घेतलेला नाही. अगोदर आम्ही ठिकठिकाणी ( जसे: चांदनी चौक, अमेठी, रायबरेली ) आम्ही जनमत चाचण्या घेतल्या. त्यात ९० टक्के लोकांनी मौन-व्रत घ्यावे असा कौल दिला व मगच आम्ही हे मौन-व्रत घेतले आहे.
(हमने अण्णा के मौन का निर्णय ऐसाही नही लिया. रायबरेली, और अमेठी मे इसके बारे मे हमने रेफरेंडम लिया था। उसमे लगभग ९० प्रतिशत लोगोंने अण्णा को चुप बैठने की सलाह दियी थी । उसके नतीजे हमने मौन व्रत चालू किया है ।)
किरण बेदी : मी आत्ताच माझ्या आयपॅडवर पाहिले तर अण्णा काही सांगत होते....पण मला आवाजच ऐकू येत नव्हता. मला वाटले माझ्या आयपॅडच्या ऑडिओतच काही तरी बिघाड आहे. पण आता कळले की हे मौन आहे. ह्याचा अर्थ माझा आयपॅड व्यवस्थितच आहे. बघा माझी बिनचूक व्यवस्था !
(मैने अभी अभी मेरे आयपॅड पे देखा की अण्णा कुछ कह रहे थे । लेकिन मुझे कुछ सुनाई नही दे रहा था । मुझे लगा की मेरे आयपॅड का ऑडिओ चल नही रहा होगा. अब मालूम हुआ की यह मौन है । इसका मतलब मेरा आयपॅड सही है ।)
प्रशांत भूषण : काश्मीर मध्ये हिंदू पंडितांचे तमाम-कामच सेपरेटिस्टांनी बंद केले. त्याला कायदेशीर दाखवण्याचे काम माझ्याकडे आले आहे. जर अण्णांचे मौन कायदेशीर असेल तर पंडितांचा आवाज बंद करवणे हेही कायदेशीरच म्हणावे लागेल. अहो, मला मारू नका !
(कश्मीर मे हिंदू पंडितोंका आवाज सेपरेटिस्ट लोगोंने कभी का बंद किया है । उसको कानूनन बताने का न्यौता मुझे मिला है । अगर अण्णा का मौन कानूनन हो सकता है तो हिंदू पंडितोंका आवाज बंद करवानाही कानूनन बनता है । मुझे मत मारो ।)
राजदीप सरदेसाई : अण्णा आपण आजवर अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्या सर्व आम्ही एक्स्लुझिव्हली कव्हर केलेल्या आहेत. तर, ह्या वेळेसही मौनाचे कव्हरेजही आम्हीच करणार आहोत. मौनावर आम्हाला थोड्या साउंड-बाईटस्‌ द्याव्यात. भले लिहून दिल्या तरी चालेल.
(अण्णाजी आपने हमे अबतक बहुत मुलाखतें दी है । इस बार मौन का कव्हरेजभी हमही एक्स्लूझिव्ह करेंगे । हमे इसपे थोडी साउंड-बाइट दीजे । भले लिखके ही सही ।)
राहूल कंवल : अण्णा मौन ठेवतात तेव्हा सगळा देश बोलत असतो. हाच आमच्या सेंटर-स्टेजचा विषय आहे. ह्यात आमचा एक फायदा असा की जर कोणी माईक आणायचा विसरला तरी मौनामुळे ते धकणारे आहे.
(अण्णाजी मौन रखते है तो देश बोल उठता है । यही हमारे सेंटर-स्टेज का विषय होगा । एक अच्छी बात इसमे ऐसी है के अगर हम माइक लाना भूलभी गये तो मौन तो कव्हर करही सकते है ।)
अरनब गोस्वामी : अणाजी आपण मौनात जे सांगाल ते देशाला कसे ऐकू येईल ?
(अण्णाजी, मौन मे आप जो बोलेंगे वो लोगोंको कैसे सुनाई देगा ?)
बरखा दत्त : अण्णाजी, हे मौन राखणे आपण भारतीय स्त्री कडून शिकला आहात का ? ह्या मौनाने आपण काय सांगू पाहता आहात ?
(अण्णाजी क्या चुप रहना आपने भारतीय नारीसे सीखा है ? इस चुप रहनेसे आप क्या बोलना चाहते है ?)
निखिल वागळे : अण्णा, आत्ताच कपिल सिबल म्हणाले आहेत की हे मौन नसून आम्ही त्यांची बोलती बंद केली आहे, ह्यावर तुम्ही काय म्हणाल ? तुम्हालाही असे वाटते का ? बघा, पडद्यावर, ८० टक्के लोक होय म्हणताहेत. आणि फक्त २० टक्केच लोक मौन पाळताहेत.
( अण्णाजी, अभी अभी कपिल सिबल बता रहे थे की यह अण्णा का मौन नही, हमने उनकी बोलती बंद की है । इसपर आपका क्या कहना है ? आप क्या समझते है ? स्क्रीन पे देखीये, ८० प्रतिशत जनता "हां" कह रही है और २० प्रतिशत मौन लेकर बैठी है । )

----------------------------------------------------------------------

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

-----------------------------------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे---१७
धाक-दपटशा !
प्रशांत भूषण ह्यांच्यावर, कॅमेर्‍यासमोर, तीन तरुणांनी मारहाण केली आणि एक मूलभूत सत्य सर्वांसमोर नागडे झाले. कितीही संस्कार संस्कार म्हटले तरी धाक-दपटशा हाच आपला मूळ स्वभाव झाला आहे.
लहानपणी वडिलांचा धाक इतका असतो की त्यापायी मुले त्यांच्याशी शक्यतो कमीच बोलतात. आई हट्ट केला की बाथरूम मध्ये कोंडून घालते म्हणून लहान मुले कोवळ्या वयातच धूर्त होऊ लागतात. शाळेत मास्तर त्यांच्या छडीचा प्रसाद देतात म्हणून अभ्यास करावा लागतो. तरुण पणात शाळा-कॉलेजात जरा दादागिरी नाही केली तर मग ते तारुण्य काय कामाचे ? राजकारणात तर ज्याचा धाक त्याचेच राज्य ! खरे तर सोनिया गांधी आजारी होत्या, भारताबाहेर ऑपरेशनसाठी गेल्या होत्या, तेव्हा सत्तापिपासूंना बंडखोरी काही अवघड नव्हती. पण उगाच रिस्क नको बुवा, कलमाडी बघा ना, बसलेत आत तिहार जेलात, इतके जवळचे असूनही. हा धाक कसा मतलबी लोकांना सरळ सुतासारखा ठेवतो. साधे पोलीसांचेच बघा. भारतात ( २००६ सालच्या सरकारी आकड्यांप्रमाणे ) दर एक लाख लोकांमागे पोलीस आहेत केवळ १४३. आता एक लाख लोक शिवाजी पार्कावर जमले तर केवढा मोठा समूदाय होतो ते आठवा. एवढ्या लोकांनी ठरवले तर १४३ पोलीसांना ते सहजी पळता भुई कमी करून सोडतील. पण त्यांचा धाक असा असतो की एवढेच पोलीस एक लाख लोकांना आवरू शकतात. सिग्नलवर मी सिग्नलच्या आधी कोणी पोलीस आडोशाला आहे का हे पाहतो व नसेल तर बेधडक सिग्नल तोडतो. पोलीस असेल तर मात्र निमूटपणे उभा राहतो. धाकाचे केव्हढे हे सिग्नल !
प्रत्येक वयस्कर माणसाला विचारा, त्याने त्याच्या आयुष्यात केव्हाना केव्हा तरी मार खाल्लेला असतो व मार दिलेलाही असतो. मागे राजीव गांधीच्या काळात प्रणब मुखर्जींना असेच एकदा त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बदडून काढले होते. नवे सरकार स्थापन होण्याच्या काळात सर्वच पक्ष आपापल्या सभासदांना पंचतारांकित हॉटेलात कोंडूनच ठेवतात. अशी तर आपली लोकशाही ! बाळासाहेबांचा दराराच अजून लोकांना शिवाजी पार्कावर भाषणाला ओढून आणतो. "स्टेट ऑफ फियर" नावाच्या मायकेल क्रिश्टनच्या कादंबरीत तर लोकांच्या भीतीपोटी सरकारे राज्य कशी करतात हेच खुबीने दाखवले आहे. माणसाच्या सगळ्या व्यवहारात भयाचे असे साम्राज्यच स्थापन झालेले असते. हाच आपल्यावरचा धाक-दपटशा !
गांधींची अहिंसा किंवा सध्या अण्णांची अहिंसा चालते आहे तीही तिच्या धाकामुळेच. उपोषण करतो म्हटले की सरकार घाबरते, ते लाखो लोक एकत्र येतील, बोंबाबोंब करतील ह्या धाकानेच सरकार नमते आहे. अहिंसाही कधी कधी हिंसा करते ती अशी ! काश्मीरचा प्रश्न त्यांनी अजून लोंबकळता ठेवलाय तो अशाच हिंसक धोरणांनी व आपणही तेव्हढ्याच हिंसेच्या प्रत्युत्तराने. काश्मीरातून पंडितांना हकलून देण्यात आले होते ते धाकानेच व आजही त्यांच्यावर थोडाफार धाक आहे तो लष्कराचाच ! धाक-दपटशा असा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे !
जंगलात एक बरे असते. इथला कायदाच मुळी, बळी तो कान पिळी. त्यामुळे इथे ठशावरून सिंहाचा ठाव घेताना त्याच्या धाकाचाच आपण अंदाज घेत असतो. आपल्या स्वभावातले धाक-दपटशाचे हे ठसे मात्र आपण आपलेच पाहून खात्री करायला हवी ! म्हणजे ? म्हणजे, वाघाचे पंजे !
-------------------------------------------------------------------------------