बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे : १६:
क्रिएटिनिनची क्रियेटिव्हिटी !
रक्ताच्या तपासणीत क्रियेटिनिन नावाचे घटक तपासतात व ते साधारणपणे ०.९ इतके असावे लागते तर तब्येत आलबेल आहे असे समजतात. बहुतेक सीरीयस पेशंटना हॉस्पिटल मध्ये असताना ह्या क्रियेटिनिनच्या भोज्याला कधी ना कधी शिवावेच लागते, इतके हे प्रकरण सर्वव्यापी आहे. हॉस्पिटल मध्ये १५/२० दिवस काढल्यावर माझे एकदा क्रियेटिनिन ३.२ वर पोचले होते. झाले, डॉक्टरांनी नेहमीच्या धोक्याच्या घंटया वाजवल्या. नेफ्रॉलॉजिस्ट ( किडनी स्पेशॅलिस्ट ) कडे जावे लागले. त्याने परत निरनिराळ्या सॉल्टस्‌चे संतुलन बघण्याच्या तपासण्या केल्या, औषधे दिली आणि खाजगीत सांगितले की घाबरू नका, फक्त भरपूर पाणी प्या ! पाच दिवसांनी परत क्रियेटिनिन तपासले. ते काही हटत नव्हते. मग डॉक्टर म्हणायला लागला ह्यावर एक इंपोर्टेड औषध आहे, जे सलाईनमधून द्यावे लागेल व ते जरा महागडे आहे, ४ हजार रुपयाची एक बाटली व अशा चारपाच तरी घ्याव्या लागतील. ह्याच डॉक्टरचे खाली औषधांचे दुकान होते. दुकानदार स्वत: म्हणाला की कमाल आहे, क्रियेटिनिन काही औषधाने लगेच खाली येणारे प्रकरण नाहीय. त्याला महिना दोन महिने लागतातच. मग ह्यावर खात्री करण्यासाठी ज्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये क्रियेटिनिन तपासतात त्या टेक्निशियनलाच विचारले की बाबा हे किती सीरीयस आहे? मरणार तर नाही ना ? त्याने सांगितले की साहेब तुम्ही एकच किडनी असलेले लोक पाहिले आहेत का ? त्यांचे क्रियेटिनिन एक किडनी निकामी झालेली असल्याने ( ती नसल्यानेच ) ८ पर्यंत जाते. काही होत नाही. एका सरकारी इस्पितळातल्या स्पेशॅलिस्टाला विचारले तर तो म्हणाला, आम्ही तर क्रियेटिनिन तपासतच नाही. काय उपयोग ? ज्यास्त असले तरी काय उपयोग, काही औषधे आहेत का ? त्यापेक्षा पायावर सूज आहे का तेवढे पहावे व होईल कमी म्हणून धकवावे.
मग डॉक्टर लोक हमखास नेहमी क्रियेटिनिनचे प्रकरण का उकरून काढतात ? कारण हॉटेल सारखेच त्यांच्या प्रॅक्टीस मध्ये किती खाटा गेलेल्या आहेत त्यावर नफा अवलंबून असतो. मुळात डॉक्टरची प्रक्टीसच लोक आजारी पडण्यावर अवलंबून असते. मग त्यांना हे क्रियेटिनिन प्रकरण चांगले मदत करते. पेशंटला घाबरवता व धरून ठेवता तर येते, पाहिजे तितका वेळ, शिवाय पेशंट मरण्याचा धोकाही नसतो. कोणाही महिना दोन महिने इस्पितळात काढलेल्या पेशंटला विचारा, त्याला हे क्रियेटिनिन प्रकरण पाठ असते !
हे क्रियेटिनिन प्रकरण अमरसिंगांच्या डॉक्टरांनी काढले नसते तर नवलच ! त्यांचे क्रियेटिनिन वाढले म्हणे ! किती ? तर ०.९ चे झाले १.३ ! आणि त्यासाठी हॉस्पिटलात दाखल करणे अत्यावश्यक असे ठरले ! ते घरी असताना त्यांचे क्रियेटिनिन वाढले असते तर काय केले असते ? तर काही नाही, जरा पाणी ज्यास्त प्यायचे झाले ! मग हा सगळा तमाशा कशा करिता ? तर तिहार जेल नको, हॉस्पिटल परवडले म्हणून. तशात सायकियॅट्रिस्टिक मदत कशासाठी हवी तर ऍंक्झाइटीसाठी. काय असते ही मदत ? औषधे असतील तर ती तिहार जेलमध्येही घेता येतील की, आणि समुपदेशनाने जात असेल तर मग ऍंक्झायटी ती काय ?
जंगलातले वाघाचे ठसे जर तो पाण्यापाशी दबा धरून बसला आहे असे दाखवत असतील तर आपण काय समजतो ? की पाण्यासाठी आलेल्या प्राण्यांची शिकार करण्याचा त्याचा मनसुबा असावा ! तसाच अमर सिंगाचा काय मनसुबा असावा, हे कळायला तर ठसेही पाह्यची गरज लागू नये ! शिवाय त्यांचे वकील कोण तर, राम जेठमलानी ! हरे राम !

---------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

सीसीटीव्ही--व्हीटीसीसी !
दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटादरम्यानच्या गदारोळात सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे खूपच वादंग झाले. अवघ्या दहा हजार रुपयाच्या ह्या कॅमेर्‍याचे एवढे काय कौतुक ? असे कॅमेरे मुंबईच्या जव्हेरी बाजारातल्या स्फोटादरम्यानही तर होतेच की, तरीही त्यातून काही सापडले का ? का मग ह्या सीसीटीव्हीचे एवढे महत्व ?
सीसीटीव्ही हा कॅमेरा नसून ही एक वृत्ती आहे. तो एक संदेश आहे. तुम्ही कायम नजरेच्या टप्प्यात आहात असे तुमच्यावर ठासवणारे हे तत्व आहे. ह्याच तत्वानुसार आधुनिक जगात नियंत्रण ठेवणे सुलभ झाले आहे. समजा तुम्ही चोर आहात व एका जवाहिर्‍याच्या दुकानात चोरी करायला गेला आहात. आणि तिथे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा कोपर्‍यात लावलेला पाहिला, तर तो नादुरुस्तही असेल असे तुम्ही समजत नाही. तर त्यात आपण न दिसता कशी चोरी करता येईल किंवा त्या कॅमेर्‍याला निकामी करून कसा कार्यभाग साधता येईल, असाच सराईत चोर विचार करील. म्हणजे एक क्षुल्लक कॅमेरा, जो कदाचित नादुरुस्तही असू शकतो, कित्येक पोलिसांचे काम करून जातो. अमेरिकेतल्या घरांसमोर नुसताच सीसीटीव्ही कॅमेरा नाही तर तो पुरवणार्‍या सुरक्षा कंपनीची पाटीही लावलेली असते. ती अर्थातच चोरावर धाक दाखवण्यासाठी असते. कित्येक वेळा ते डमी कॅमेरेच निघतात.
पूर्वी एक म्हण असायची की जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्‍यांच्या काचेच्या घरावर दगडं मारू नयेत. ह्यामागे आपल्याही काचेच्या घरावर इतरांनी दगडं मारली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा तुम्ही काचेच्या घरातून दगडं मारताना सहजी दिसाल व पकडल्या जाल ही शक्यताच ज्यास्त महत्वाची आहे. जगातले सगळे नैतिक वागणे ह्याच भीतीपोटी, चांगले दिसण्याच्या निकडीपायी समाजाने विचारात घेतले आहे असे कोणाच्याही ध्यानात येईल. सीसीटीव्ही कॅमेरा चालू असो वा नसो, तो आहे एवढेच वास्तव आतंकवाद्याला अडचण निर्माण करणारे असते. असाच दिसल्या जाण्याचा धाक आपल्याला शाळेत वर्गात गडबड करताना, घरात वडिलांच्या उपस्थितीत, परिक्षेत सुपरवायझर देखरेख करताना, सिग्नल तोडताना आजूबाजूला पोलीस नाही ना ह्या खबरदारीमागे, सामाजिक समारंभात चांगले वागताना ( अगदी वैर्‍याशीही हस्तांदोलन करताना ), घरात पाहुणे आले असताना अस्ताव्यस्तता दिसू नये ह्या खबरदारीमागे असतो, हे सहजी आपल्या लक्षात येईल.
असाच एक कॅमेरा, जो सीसीटीव्ही च्या अगदी विरुद्ध आहे ( म्हणून समजा आपण त्याला व्हीटीसीसी म्हणूयात ! ) असा असतो व तो नियंत्रण करणारा वापरत असतो किंवा निदान तशी त्याची इच्छा असते. उदाहरण घ्या, सोनिया गांधींचे. सगळ्या जगाला माहीत आहे की खरी सत्ता ह्या बाईकडेच आहे. पण ती कायम लोकांच्या नजरेपासून दूर राहते. मी नाही, मनमोहन सिंग हे पंतप्रधान असल्याने, सर्वेसर्वा आहेत, असे ती चाणाक्षपणे आपल्याला भासवते. म्हणजे तिच्या ह्या व्हीटीसीसी कॅमेर्‍याने तिचे नियंत्रण आपल्याला दिसणार नाही अशी तिची इच्छा असते. ह्याच पडदा टाकण्याच्या वृत्तीपायी मग त्या आपले दुखणेही जनतेपासून लपवून ठेवतात. आणि हे लपवून ठेवणे किती कीव येण्याजोगे आहे ते पहा. आपण जर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलात उपचाराला गेलो तर लोकांना नक्कीच कळते की आपल्याला काय झाले आहे, किंवा टाटा मेमोरियल मध्ये गेलात तर कॅंसर झालाय, हे सांगावेच लागत नाही. तसेच त्यांना न्यूयॉर्कच्या स्लोन-केटरिंग मेडिकल हॉस्पिटलात शस्त्रक्रियेला नेले म्हणजे काय झालेय हे ज्यांना स्लोन केटरिंग हे कॅंसरचे सर्वात प्रगत हॉस्पिटल आहे हे माहीत आहे त्यांना लगेच कळते. मग कितीही व्हीटीसीसी कॅमेरे लावून धूसरता पसरवली तरी जे कळायचे ते लोकांना कळतेच. पण ह्यातून सत्ता गाजवणार्‍यांना स्वत: पडद्याआड राहणे किती निकडीचे असते त्याची चुणूक पहायला मिळते.
अण्णा हजारेंना अटक करण्याचे हुकूम कोणी दिले हे जनतेला तेव्हाच कळते, जेव्हा होम मिनिस्टर म्हणतात की मला माहीत नाही, हे काम पोलीस कमिश्नरांचे आहे, त्यांना माहीत असेल. ह्या म्हणण्यामागे मलाही असा व्हीटीसीसी कॅमेरा, पडदा ठेवणारा कॅमेरा, हवाय असेच ते जणु मागत असतात. राज-सत्ता उपभोगणार्‍याला पडद्याची गरज अशी प्रचंड असते व ते ती अशी वेळोवेळी न दाखवणारे व्हीटीसीसी कॅमेरे उभारून दाखवत असतात.
सीसीटीव्ही कॅमेरा काय घडतेय ते टिपत असतो तर व्हीटीसीसी ऍंटी-कॅमेरा काय दिसतेय त्यावर पांघरूण घालीत असतो !

--------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

स्टीव्ह जॉब्ज
वेस्ट इंडीजला असताना एक भारी विनोद प्रचारात होता. तो असा की "ऍडम ऍंड ईव्ह" ही जुन्या काळातली लैंगिकता झाली. आज पुढारलेल्या काळात ती आहे: "ऍडम ऍंड स्टीव्ह !" तर स्टीव्ह नावाचा परिचय मला असा झाला होता. हा स्टीव्ह जॉब्ज दुसरा !
सध्या अमेरिकेला जेव्हढी तूट आहे तेव्हढी रोख रक्कम ह्या स्टीव्ह जॉब्जच्या ऍपल कंपनीकडे शिल्लक आहे, ह्यावरूनच त्याच्या यशाचे मोजमाप कोणीही करावे. आणि हे सुद्धा ह्या पार्श्वभूमीवर की दहा वर्षांपूर्वी ह्याच कंपनीने ह्याला चक्क काढून टाकले होते. आणि हा एकेकाळी भारतीय मंदीरात फुकटचे मिळते म्हणून जेवण घेत असे. माणूस किती मोहक असावा ! एव्हढ्या यशाच्या शिखरावर असून स्वत: अगदी अलिप्त राहणारा. कॅंसरशी एकाकी झुंज देणारा. लीव्हर ट्रान्सप्लॅंट करून पॅंक्रीयसच्या कॅंसरशी टक्कर देणारा. कॅंसरच्या उपचारासाठी कंपनीतून दोनदा सहा सहा महिन्यांची रजा घेणारा. आणि तरीही त्या दरम्यान आय-फोर हा क्रांतीकारी फोन बाजारात आणणारा. आजही एक जीन व काळे टी शर्ट असा साधा पोषाख एक फॅशन म्हणून संगणक जगात रूढ करणारा. आई-बापांनी दत्तक घेतलेला एक मुलगा इतका प्रसिद्ध व्हावा ह्यात काहीतरी देवाचे संदेश आहेत असे वाटावे. ह्याची उत्पादने किती खपावीत ? अमेरिकेत सकाळीच लोक ह्याच्या दुकानांसमोर रांगा लावतात व नऊ दहा वाजेपर्यंत माल संपला म्हणून त्यांना सांगावे लागते. यश मिळावे तरी किती अजून, इतके हे प्रचंड यश आहे.
ह्याचे स्टॅन्फोर्ड मध्ये शिक्षण अर्धवट टाकून कंपनी सुरू करणे असेच मोहक आहे. आज अमेरिकेत ऍपल कंपनीचे संगणक तरुणात फारच लोकप्रिय आहेत इतके ते वापरायला सोपे आहेत. ह्याचा आवडता विषय होता : कॅलिग्राफी. म्हणजे सुलेखन किंवा आपले अच्युत पालव जे अक्षरांचे निरनिराळे प्रकार करतात त्याचे शास्त्र. ह्याचे सगळेच और आहे.
माझा मुलगा एका संगणक कंपनीत डायरेक्टर असून स्वत: प्रोग्रॅम करतो. त्याला मी एकदा सहज विचारले होते की स्टीव्ह जॉब्ज हा बिल गेटस्‌ पेक्षा ज्यास्त हुशार समजायचा का ? कारण आज इतकी वर्षे झाली बिल गेटस्‌ ची ऑपरेटींग सिस्टीम अजून रोज वाढत्या क्रमाने लोकप्रिय होतच आहे. संगणक क्षेत्रात कुठलीही बाब एक दोन वर्षापेक्षा मंजधारेत रहात नाही आणि ह्याची इतकी वर्षे टिकलीय म्हणजे हाच श्रेष्ठ विद्वत्तेचा असा माझा समज. तर त्याच्याशी तुलना करता आता स्टीव्हचाच पहिला नंबर आपण काढू. ह्यावर कंपन्यांचे काम करणे कसे असते हे जवळून पहात असलेला माझा मुलगा म्हणाला: आजकाल एका माणसाच्या विचाराने एखादे उत्पादन, कल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादन व ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत प्रभावित होईल हे खूप अशक्य आहे. उत्पादने इतकी गुंतागुंतीची झालेली आहेत की त्यांना प्रत्यक्षात काम करायला हजारो हुशार माणसांचे योगदान लागते व ते ज्या कंपनीला जेव्हा जमते तेव्हाच त्यांना यश लाभते. म्हणजे ऍपलच्या यशात एकट्या स्टीव्ह जॉब्जचा वाटा किती व त्याच्या हुशार इंजिनियरांचा किती, कंपनीच्या एकूण कारभाराचा वाटा किती हे सखोल संशोधनाचेच काम आहे असे समजायचे.
जगात आत्तापर्यंत तीनच सफरचंदे प्रसिद्ध होती. एक ऍडमने ईव्हला दिलेले, दुसरे न्यूटनने पडताना पाहिलेले, व एक रोज खाल्ल्याने डॉक्टरांना दूर ठेवणारे. आता हे चौथे सफरचंद ( ऍपल ), स्टीव्ह जॉब्जचे, येणारी कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणार आहे. त्याच्या सेवनाने त्याचा संस्थापक लवकरच बरा होवो !
स्टीव्ह जॉब्ज
वेस्ट इंडीजला असताना एक भारी विनोद प्रचारात होता. तो असा की "ऍडम ऍंड ईव्ह" ही जुन्या काळातली लैंगिकता झाली. आज पुढारलेल्या काळात ती आहे: "ऍडम ऍंड स्टीव्ह !" तर स्टीव्ह नावाचा परिचय मला असा झाला होता. हा स्टीव्ह जॉब्ज दुसरा !
सध्या अमेरिकेला जेव्हढी तूट आहे तेव्हढी रोख रक्कम ह्या स्टीव्ह जॉब्जच्या ऍपल कंपनीकडे शिल्लक आहे, ह्यावरूनच त्याच्या यशाचे मोजमाप कोणीही करावे. आणि हे सुद्धा ह्या पार्श्वभूमीवर की दहा वर्षांपूर्वी ह्याच कंपनीने ह्याला चक्क काढून टाकले होते. आणि हा एकेकाळी भारतीय मंदीरात फुकटचे मिळते म्हणून जेवण घेत असे. माणूस किती मोहक असावा ! एव्हढ्या यशाच्या शिखरावर असून स्वत: अगदी अलिप्त राहणारा. कॅंसरशी एकाकी झुंज देणारा. लीव्हर ट्रान्सप्लॅंट करून पॅंक्रीयसच्या कॅंसरशी टक्कर देणारा. कॅंसरच्या उपचारासाठी कंपनीतून दोनदा सहा सहा महिन्यांची रजा घेणारा. आणि तरीही त्या दरम्यान आय-फोर हा क्रांतीकारी फोन बाजारात आणणारा. आजही एक जीन व काळे टी शर्ट असा साधा पोषाख एक फॅशन म्हणून संगणक जगात रूढ करणारा. आई-बापांनी दत्तक घेतलेला एक मुलगा इतका प्रसिद्ध व्हावा ह्यात काहीतरी देवाचे संदेश आहेत असे वाटावे. ह्याची उत्पादने किती खपावीत ? अमेरिकेत सकाळीच लोक ह्याच्या दुकानांसमोर रांगा लावतात व नऊ दहा वाजेपर्यंत माल संपला म्हणून त्यांना सांगावे लागते. यश मिळावे तरी किती अजून, इतके हे प्रचंड यश आहे.
ह्याचे स्टॅन्फोर्ड मध्ये शिक्षण अर्धवट टाकून कंपनी सुरू करणे असेच मोहक आहे. आज अमेरिकेत ऍपल कंपनीचे संगणक तरुणात फारच लोकप्रिय आहेत इतके ते वापरायला सोपे आहेत. ह्याचा आवडता विषय होता : कॅलिग्राफी. म्हणजे सुलेखन किंवा आपले अच्युत पालव जे अक्षरांचे निरनिराळे प्रकार करतात त्याचे शास्त्र. ह्याचे सगळेच और आहे.
माझा मुलगा एका संगणक कंपनीत डायरेक्टर असून स्वत: प्रोग्रॅम करतो. त्याला मी एकदा सहज विचारले होते की स्टीव्ह जॉब्ज हा बिल गेटस्‌ पेक्षा ज्यास्त हुशार समजायचा का ? कारण आज इतकी वर्षे झाली बिल गेटस्‌ ची ऑपरेटींग सिस्टीम अजून रोज वाढत्या क्रमाने लोकप्रिय होतच आहे. संगणक क्षेत्रात कुठलीही बाब एक दोन वर्षापेक्षा मंजधारेत रहात नाही आणि ह्याची इतकी वर्षे टिकलीय म्हणजे हाच श्रेष्ठ विद्वत्तेचा असा माझा समज. तर त्याच्याशी तुलना करता आता स्टीव्हचाच पहिला नंबर आपण काढू. ह्यावर कंपन्यांचे काम करणे कसे असते हे जवळून पहात असलेला माझा मुलगा म्हणाला: आजकाल एका माणसाच्या विचाराने एखादे उत्पादन, कल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादन व ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत प्रभावित होईल हे खूप अशक्य आहे. उत्पादने इतकी गुंतागुंतीची झालेली आहेत की त्यांना प्रत्यक्षात काम करायला हजारो हुशार माणसांचे योगदान लागते व ते ज्या कंपनीला जेव्हा जमते तेव्हाच त्यांना यश लाभते. म्हणजे ऍपलच्या यशात एकट्या स्टीव्ह जॉब्जचा वाटा किती व त्याच्या हुशार इंजिनियरांचा किती, कंपनीच्या एकूण कारभाराचा वाटा किती हे सखोल संशोधनाचेच काम आहे असे समजायचे.
जगात आत्तापर्यंत तीनच सफरचंदे प्रसिद्ध होती. एक ऍडमने ईव्हला दिलेले, दुसरे न्यूटनने पडताना पाहिलेले, व एक रोज खाल्ल्याने डॉक्टरांना दूर ठेवणारे. आता हे चौथे सफरचंद ( ऍपल ), स्टीव्ह जॉब्जचे, येणारी कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणार आहे. त्याच्या सेवनाने त्याचा संस्थापक लवकरच बरा होवो !

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

वाघाचे पंजे---१३
सोनियांचे धूमजाव !
मनमोहनसिंगांचे तिसरे बायपास ऑपरेशन भारतात, अटल बिहारी बाजपेयी उपचार घेताहेत भारतात, अशी कितीतरी उदाहरणे आपण पाहतो की उपचार कुठे घेणे सोयीस्कर पडते आजकाल त्याची . शिवाय काय आजार असेल त्याची इत्थंभूत माहीती लोकांना मिळतेच. आमचे एक शेजारी एका सरकारी दफ्तरात खूप मोठे अधिकारी होते. ते आमच्याच औषध दुकानातून औषध घेत. एकदा बोलता बोलता सहज दुकानदार बोलून गेला की, नाही-- त्यांना बराच त्रास आहे. मी विचारले कसचा ? तर म्हणाला डिप्रेशनचा. जो अजिबात काही शिकलेला नाही, त्या दुकानदारालाही औषधांवरून कळले की ह्यांना डिप्रेशन आहे. आता कोणी टाटा मेमोरियल ( कॅंन्सर हॉस्पिटल ) मध्ये उपचार घेत असेल तर साहजिकच ते कॅंन्सरवरचे असणार. आणि आजकाल असा कोणता आजार आहे की ज्याच्याबद्दल लाज वाटावी ? अगदी एड्स्‌ झाला तरी त्याचे कोणाला काही वाटू नये इतके सर्व आजार हे सन्मान्य झाले आहेत. तेव्हा पूर्वी जसे गुप्त-रोगाबद्दल गुप्तता बाळगीत तशी आजकाल कोणत्याच रोगाबद्दल गुप्तता बाळगण्याचे कारण राहिलेले नाही. शाहरुख खान एवढा प्रतिमेला जपणारा पण तो सारखा सिगरेटी ओढतो हे लहान मुलांनाही माहीत असते.
तर हे नमन कशाला ? तर सोनिया गांधींना खरेच काय झाले असावे ? स्लोन केटरिंग हे कॅंन्सरचेच हॉस्पिटल आहे. आणि असला समजा कॅंन्सर तर काय बिघडते ? आजकाल कॅंन्सरनेही काही कोणी लगेच मरत नाही. आठ-दहा वर्षात बरेही होतात. मग एवढी गुप्तता का पाळताहेत ? एक कारण असावे--मॅडम आजारी आहेत म्हटल्यावर मंडळी कोपर्‍यानेही खणायला लागतील त्याची ? हॅ ! अशा खाण्याबिण्याचे कोणाला काय पडलेय ?
किंवा असे तर नसेल ? आता सीएजीचा रिपोर्ट येणार आहे त्याची तारीख त्यांना नक्कीच माहीत असणार. तिहार मध्ये आता इतके राजकारणी जमा होताहेत की खरे पैसे कुठे पोचवलेत ते आता केव्हाही सांगतील. मग बाहेर जाणेही शक्य होणार नाही. इराणच्या शहाचे आठवतेय का ? त्याने व त्याच्या बायकोने कपडेलत्ते-जडजवाहीर-पैसे ह्याने भरलेले एक विमान कायम तयार ठेवलेले होते म्हणतात व त्यातूनच तो पळाला होता. सद्दाम हुस्सेन असाच एक बिलियन डॉलर घेऊन पोबारा करणार होता. पाकीस्तानचे मुशर्रफ असेच लंडनला दडून बसलेले आहेत. बेनझीरही आधी तिथेच होती. तेव्हा सत्ताधार्‍यांनी वाईट काळ आल्यावर पळून जाणे काही नवे नाही. त्याच्यासाठीच आजकाल कोणालाही पकडले तर आधी पासपोर्ट जप्त करतात. आयपीएल वाले मोदी नाही का पळून गेले म्हणूनच बचावले ? अशांची सोयही लागते तिकडे पटकन, पैसे असले की.
सगळे कुटुंब मिळून जाण्यासाठी आजार हा चांगला पटण्यासारखा बहाणा आहे. शिवाय तिथली सोय होण्यासाठी सगळे असेच तर करतात. ईजिप्तचे होस्नी मुबारक ह्यांना तर पलंगासकट तुरुंगात ठेवले असून कदाचित आजारपणामुळेच सोडतीलही. लंडनला एका राजकीय अपराध्याला सोडल्याच्या बर्‍याच कहाण्या आहेत.
जंगलात वाघांच्या पंजांच्या ठशावरून ते कोणत्या दिशेने गेले असतील, किती असतील, हे जाणकार जसे ओळखतात तसे हे वाघाचे पंजे काय दाखवतात बरे ?

-------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, २० जुलै, २०११

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे-----१२
कटरीनाचा इंडियन कैफ
शितावरून भाताची परीक्षा किंवा जंगलात नुसत्या वाघाच्या पंजांच्या ठशावरून वाघाचा ठावठिकाणा शोधण्या सारखाच प्रकार आहे, लोकांच्या बेसावध बोलण्यावरून काही मूलभूत समजूती समजून घेण्याचा.
काय म्हणाली कटरिना ? तिचे वडील एशीयन होते, आई ब्रिटिश होती, आणि ती सध्या इंडियन सिनेमाची अनभिक्षित राणी आहे, म्हणून काय झाले, मी काही एकटीच अशी अर्धी इंडियन नाहीय, राहूल गांधीही असेच अर्धे इंडियन आहेत की ?
आता ह्यावरून राष्ट्रीयतेच्या कल्पना कशा रुजतात, कशा बदलतात हे पाहणे मोठे मजेशीर आहे. आजकाल भारतात प्रत्येक घरटी एक तरी जण अमेरिकेत असतो. आणि तो खूप वर्षांपासून तिथे असेल तर तो अमेरिकनच असतो. पण ते जेव्हा इथे येतात, किंवा तिथे असतानाही, त्यांना आपण व तिथले लोक भारतीयच समजतो. भले त्यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्व असो, अमेरिकन पासपोर्ट असो. सुरुवातीला त्यांना ते अमेरिकन आहेत, असेच दाखवायचे असते. पण त्यांचे चेहरे, रंग-रूप हे असते भारतीय. तेव्हा त्यांना तिथले लोक भारतीयच समजतात, तसेच वागवतात. हळू हळू त्यांना तो समज पत्करावा लागतो. माझी नातवंडे अमेरिकन नागरिक आहेत. ती नुकतीच सुटीत भारतात आली होती. सुटीच्या रिवाजाप्रमाणे आमचे खूप सिनेमे पाहणे झाले. सिनेमे होते अमेरिकनच. जसे कुंफू पांडा-२, पायरेटस्‌ ऑफ कॅरीबीयन, हॅरी पॉटर वगैरे. आजकाल मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमाच्या अगोदर राष्ट्रगीत होते. आणि एक राष्ट्रगीत तर मुक्या-बहिर्‍यांच्या भाषेतले एव्हढे अप्रतीम आहे की ते सगळ्यांच्याच मनाला शिवते. पाच सहा सिनेमात माझी नातवंडे जन-गण-मन सहज गुणगुणू लागली. ते त्यांना पाठ झाले व आवडलेही. मी त्यांना अमेरिकन ऍंथेम विषयी विचारले तर कां कू करीत सांगू लागली की आम्हाला ते येत नाही, कारण आमच्याकडे ते क्वचितच वाजवतात, म्हणतात. आता राष्ट्रगीत येण्यावरून काही नागरिकत्व ठरत नाही हे खरे, पण ह्या अमेरिकन नातवंडांना, एका सुटीत, हेच आपले राष्ट्रगीत वाटू लागले आहे. मग हे भारतीयच झाले की !
असेच "अर्धे इंडियन" ह्या समजूतीचे आहे. बाप किंवा आई ह्यापैकी एकच इंडियन असेल तर त्यांची मुले आपण म्हणतो अर्धी इंडियन आहेत. आता जीवशास्त्राप्रमाणे हे बरोबर का चूक माहीत नाही, पण साधारणपणे आपण असेच समजतो. कांटेकोरपणे पाहिले तर इंदिरा गांधींचे यजमान फिरोज गांधी हे मुसलमान होते, त्यांचे लग्नही इंग्लंडला त्याच पद्धतीने झाले होते. पण महात्मा गांधींच्या मध्यस्तीमुळे ते परत हिंदू पद्धतीने भारतात झाले. ह्या समजूतीने राजीव गांधी अर्धे मुसलमान, अर्धे हिंदू होतील. त्यामुळेच सोनियांच्या आईवडिलांचा सुरुवातीला विरोध झाला असावा. आता त्यांचा मुलगा राहूल, आई ख्रिश्चन व बाप अर्धा मुसलमान, ह्या हिशेबाने ठरेल पाव मुसलमान व अर्धा ख्रिश्चन !. ( म्हणूनच कदाचित तो उरलेली मुसलमानी पावली, शोधीत असावा ! ).
सौंदर्य जसे चित्रात नसून ते चित्र पाहणार्‍याच्या डोळ्यात असते, तसेच भारतीयत्व किंवा हिंदुत्व हे पाहणार्‍यांच्या समजूतीत असायला हवे ! चित्रा वरून एम.एफ.हुसेन ह्यांची आठवण निघायलाच हवी . कतार सरकार काही सवलती देते म्हणून ते भले कतारी झाले असतील, पण इतिहास व जनता त्यांना भारतीय चित्रकारच मानणार . हिंदूंच्या विरोधामुळे ते भारत सोडून गेलेले असले तरी लोक त्यांना भारतीयच समजणार. मग कागदोपत्री काही का असेना !
हेच तर आहे, म्हंजे, म्हंजे, वाघाचे पंजे !

-----------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, १ जून, २०११

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे----११
दादरची चैत्यभूमी , बारामतीची चरामती/करामती !
आता वेळ आलीच आहे तर दादर बरोबर सगळीच नावे बदलूयात :
-------------------------------------------
दादर ( जिथे सगळेच मध्ये मध्ये आहे ) : चैत्यभूमी , किंवा मराठीत आंबेडकर, थांबा ! ( रेल्वे प्रवाशांसाठी दिदींचा प्रस्ताव : C H A I T Y A B H O O M E E , ही एवढी अक्षरे एका तिकिटात न मावण्याने दादरच्या प्रवाशांना दोन तिकिटे घ्यावी लागतील ! )
------------------------------------------------
शिवाजी पार्क ( जिथे राज ठाकरे राहतात ): लुंपीनी पार्क किंवा चैत्यभूमी ( वेस्ट )
--------------------------------------------------------------------------
बांद्रा ( जिथे कोण राहतात ?) : दैत्यभूमी
----------------------------------------------------------
बारामती ( जिथे पूर्वीचे साक्यमुनी चराचरात चरतात ) : चरामती ( सत्तेवर असताना), करामती ( सत्तेवर नसताना )
-------------------------------------------------------------------------------------------------
लातूर ( जिथे अनेक पॅटर्न्स असतात ) : ( इटालियन थाटात ) la tour
---------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड ( जिथे सगळेच "आदर्श" फिके पडतात ) : सव्वा-देड ! किंवा आम-बेड !
-------------------------------------------------------------------------------------
पुण्यातील सदाशिव पेठ ( जिथे "ब्राह्मण हिंदुत्वात विष कालवतात" असे नेमाडेंना दिसते ) : रमा पेठ ( आंबेडकरांच्या मुलाने जसा रमाबाईंवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला होता, त्या विषप्रयोगाच्या स्मृतीत ! )
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिल्ली ( जिथे भावी राजकुमार वाट पाहतात ) : राहूलचा हूल किंवा राहूल-चाहूल किंवा रा-हूलचा-हूल किंवा राहूल-नग-र
---------------------------------------------------------------------------------------------------------
कराड ( जिथे कुंपणच सर्वत्र मिरवते ) : यशोदरा-नगर किंवा यशोदा-नग-र किंवा येस-सर-नगर
---------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई ( जिथे बुद्ध धर्माचा मूल मंत्र घुमतो ) : दु:खई , दु:ख-खाई, डुंबई ( पावसाळ्यात)--हुंबई ( उन्हाळ्यात )--शानगयी ( कायम )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गांधीनगर ( जिथे मोदींना चांगले म्हणताच येत नाही ) : मोदी-बगैर-नगर किंवा दंगलाबाद किंवा दंगलानाबाद किंवा तीस्तासेटलमेंट
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
चेन्नई ( जिथे राज्य येते, जाते ) : चैन नई , किंवा चैन-नाही किंवा चेन नयी
-----------------------------------------------------------------------------------------------------------
बेंगळूरू ( जिथे राज्य जाता जाता राहते, राज्यपाल पालीसारखा चुकचुकतो ) : बेंग-सुरुळू , बिंग-सुरुळू , किंवा बिंग-गळू-सुरू
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
हैद्राबाद ( जिथे बाप जातो, मुलगाही जातो ) : हैक्याबापबाद किंवा कौन बापबाद किंवा है-बाप-बाद
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आग्रा ( जिथे कधी माया कधी गया ) : वा आज ! वा माज !
-------------------------------------------------------------------------------------------------------
नवीन नावाप्रमाणेच प्रत्येकाला एक युनीक आयडेंटीटी नंबर ( आधार ) घेणे क्रमप्राप्त आहे . ओळखा पाहू हा कोणाचा नंबर : 4912


( क्ल्यू : 4912 आपण हाताने लिहितो तसे लिहा, वरच्यासारखे दिसेल : प वा र, ह्याचा आधार असा : एकूण नऊ खंडापैकी चार खंडात ( त्रिखंडापेक्षा ज्यास्त) ज्यांचे भूखंड ते बारा मतीवाले ! काका तसेच पुतणे ! )
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------